नंदुरबारकरांनो पाणी जपून वापर! धरणात फक्त 50 टक्केच पाणीसाठा शिल्लक

नंदुरबार शहराला दसऱ्यानंतर दोन दिवसांआड पाणीपुरवठा होणार; नगरपालिकेचा निर्णय...
नंदुरबारकरांनो पाणी जपून वापर! धरणात फक्त 50 टक्केच पाणीसाठा शिल्लक
नंदुरबारकरांनो पाणी जपून वापर! धरणात फक्त 50 टक्केच पाणीसाठा शिल्लक दिनू गावित

नंदुरबार - जिल्ह्यात कमी पर्जन्यमानामुळे अनेक लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये क्षमतेपेक्षा कमी पाणीसाठा जमा झाला आहे. नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणात केवळ 50 टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने नंदुरबार नगर परिषदेने दसऱ्यानंतर नंदुरबार शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली आहे.

हे देखील पहा -

नंदुरबार शहरातील नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा अतिरिक्त वापर कमी करून पाणीबचत करण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून भविष्यात पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासणार नाही. जिल्ह्यात यंदा कमी पर्जन्यमानामुळे लघु मध्यम प्रकल्पांमध्ये पूर्ण क्षमतेने पाणीसाठा जमा झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यावर व शेती सिंचनावर मोठा परिणाम होणार असून प्रशासनाने उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. नागरिकांनी देखील पाणी जपून वापरण्याची काळाची गरज आहे. अन्यथा पाणीबाणी संकटाला सामोरे जावे लागेल.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com