...तर CM एकनाथ शिंदेंनी किल्ले शिवनेरीवर येऊ नये; अमोल कोल्हे संतापले

राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना छत्रपती शिवरायांच्या आग्र्याहून सुटकेच्या ऐतिहासिक घटनेशी केल्यानंतर पुन्हा वादाला तोंड फुटलं आहे.
Dr Amol Kolhe, CM Eknath Shinde
Dr Amol Kolhe, CM Eknath ShindeSAAM TV

नवनीत तापडिया

Aurangabad News : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेलं वक्तव्य आणि त्यानंतर आता राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाची तुलना छत्रपती शिवरायांच्या आग्र्याहून सुटकेच्या ऐतिहासिक घटनेशी केल्यानंतर पुन्हा वादाला तोंड फुटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी यावरून थेट मुख्यमंत्री शिंदेंना इशारा दिला आहे.

राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज, बुधवारी आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना थेट शिवाजी महाराज यांच्या आग्र्याच्या सुटकेच्या घटनेशी केली. यावरून लोढा यांच्यावर टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी यावरून टीकास्त्र सोडलं आहे. (Maharashtra Politics News)

Dr Amol Kolhe, CM Eknath Shinde
शिवराय आग्र्याहून सुटले, तसे शिंदेही सुटले; महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या वक्तव्यामुळं नवा वाद

मूळ मुद्द्यांपासून राज्यातील जनतेची दिशाभूल करण्यासाठी अशी वक्तव्ये वारंवार केली जात आहेत. यापुढे शिवाजी महाराजांबद्दल अशी वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत, असा इशारा कोल्हे यांनी यावेळी दिला. शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये थांबवता येत नसतील, तर येणाऱ्या शिवजयंतीला मुख्यमंत्र्यांनी किल्ले शिवनेरीवर पाय ठेवू नये, असंही कोल्हे म्हणाले.  (Latest Marathi News)

Dr Amol Kolhe, CM Eknath Shinde
Ajit Pawar : वाचाळवीरांना आवारा, आवरा, आवरा... अजित पवारांकडून मंगलप्रभात लोढांना त्यांच्या शैलीत शाब्दिक डोस

'लोढा यांनी तात्काळ माफी मागावी'

शिंदेंच्या बंडाची तुलना छत्रपती शिवरायांच्या आग्र्याच्या सुटकेच्या घटनेशी केल्यानंतर मंगलप्रभात लोढा हे टीकेचे धनी ठरले आहेत. त्यांच्यावर आमदार अमोल मिटकरी यांनी टीकास्त्र सोडलं. लोढा यांना इतिहास माहिती असण्याची सुतराम शक्यता नाही. धक्कादायक बाब म्हणजे शंभूराजे यांनी त्यांच्या वक्तव्याचे समर्थन केलं आहे. म्हणजे शिंदे गटाचे समर्थन करत आहेत का? तत्काळ मंगलप्रभात लोढा यांनी माफी मागावी, असं मिटकरी म्हणाले.

मंगप्रभात लोढा नेमके काय म्हणाले?

प्रतापगडावर शिवप्रतापदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी उपस्थितांना संबोधित केले. छत्रपती शिवाजी महाराज यांना औरंगाजेबाने पकडून आग्र्याच्या किल्ल्यात जेव्हा बंदीस्त केलं होतं. त्यावेळी शिवाजी महाराजांनी स्वत: साठी नाही, तर हिंदवी स्वराज्यासाठी युक्ती काढत सुटका करून घेतली. त्यामुळेच भारतात हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. असाच प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही रोखण्याचा झाला. पण एकनाथ शिंदे यांनी सुद्धा तशीच सुटका करून घेतली आणि महाराष्ट्रात हिंदुत्वाचं सरकार स्थापन झालं, असं मंगलप्रभात लोढा म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com