भविष्यात कारखाने आणि वाहने हायड्रोजनवर चालणार; नितीन गडकरी यांचे पुन्हा धमाकेदार वक्तव्य

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी कार्यतत्परतेमुळे देशात ओळखले जातात. त्यांच्या खात्याच्या विकासकामामुळे देशभर चर्चेत असतात.
Nitin Gadkari
Nitin Gadkari Saam Tv

मोबीन खान

अहमदनगर : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी कार्यतत्परतेमुळे देशात ओळखले जातात. त्यांच्या खात्याच्या विकासकामामुळे देशभर नावाजले जातात. सध्या नितीन गडकरी (Nitin Gadkari) साखर कारखान्यावर केलेल्या एका विधानामुळे चर्चेत आहेत. दरम्यान, गडकरी यांनी एक नवं धमाकेदार वक्तव्य केलं आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. (Nitin Gadkari Latest News In Marathi)

Nitin Gadkari
'सुरक्षेची हमी ना भविष्याची तरतूद; 'अग्निपथ’च्या नावाखाली मोदी सरकारकडून तरुणांची क्रूर थट्टा'

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थित ज्येष्ठ नेते आणि माजी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड (Madhukar Pichad) यांचा ८२ वा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. त्या कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते.

'उस हे शेतकऱ्यांच्या प्रगतीचं मापदंड झालं आहे. आज गहू (Wheat) स्वस्त आणि ब्रेड महाग झाला आहे. टोमॅटो स्वस्त मात्र सॉस महाग झाला आहे. या वर्षी साखरेचे उत्पादन जास्त झालं आहे. आता केवळ साखर बनवण्याऐवजी वेगळा विचार करावा लागेल. मी तेरा वर्षापासून साखर कारखाना चालवतोय. खूप कस निघाला. यावर्षी कारखाना नफ्यात आला आहे. पाण्यातून ऑक्सिजन आणि हायड्रोजन (Hydrogen) वेगळं करता येणं शक्य आहे. भविष्यात गाड्या, कारखाने, विमान हायड्रोजनवर चालणार. मी सांगत असल्याचा बायकोला विश्वास बसत नव्हता. म्हणून मी गाडी चालून दाखवली आहे. मी बोलतो ते करतोच', असं धमाकेदावर वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे.

Nitin Gadkari
अदानींच्या वाहनाचे सारथ्य; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, तर चर्चा होऊद्यात!

पुढे गडकरी म्हणाले, 'भविष्यात चारचाकी आणि दुचाकी १०० टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या येणार आहे. शेतकरी उर्जादाताही बनायला हवा. आता आपला दृष्टीकोन भविष्याच्या दृष्टीने बदलावे लागेल. तरुणांनी पुढाकार घेऊन काम करणे गरजेचं आहे'.

मधुकर पिचडांवर भाष्य करताना गडकरी म्हणाले, 'महाराष्ट्रात आदीवासींसाठी काम करणाऱ्या नेत्यांमध्ये मधुकर पिचड अग्रस्थानी आहेत. पिचड साहेबांशी असलेल्या प्रेमाच्या संबंधामुळे आज मी कार्यक्रमाला आलोय. कोणताही माणूस जातीपेक्षा त्याच्या कार्याने मोठा होतो. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोणत्या जातीचे नेते नाही आहेत. येणाऱ्या काळात जातीविरहित समाज व्यवस्था उभं करण्याचं आव्हान आहे. मात्र, प्रत्येक व्यक्तीला घर, अन्न, रोटी , कपडा मिळत नाही, तोवर हे शक्य नाही'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com