ऊसामुळे एकदिवस आत्महत्येची वेळ येईल; नितीन गडकरींचे वक्तव्य

'एवढ्या मोठ्या प्रमाणात जर ऊसाची लागवड होत राहिली तर एक दिवस आत्महत्या करण्याची वेळ येईल'
Nitin Gadkari
Nitin GadkariSaam TV

सोलापूर : पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यात विशेषत: सोलापूर जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात ऊसाचं गाळप होत आहे. मात्र, ऊसाचं (sugarcane) क्षेत्र दिवसेंदिवस वाढत राहिले तर एकदिवस आत्महत्या करण्याची वेळ येईल, माझा शब्द लिहून ठेवा असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे.
गडकरी आज सोलापूर (Solapur) येथे ८,१८१ कोटी रुपये किंमतीच्या व २९२ किमी लांबीच्या १० राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी ऊसाच्या पिकाविषयी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, 'सोलापूर हा एकेकाळी दुष्काळी जिल्हा होता. मात्र, यंदाच्या साली सोलापूर जिल्ह्यात २२ लाख टन ऊसाचं गाळप झालं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात जर ऊसाची लागवड होत राहिली तर एक दिवस आत्महत्या करण्याची पाळी येईल असं म्हणत वाढत्या ऊस उत्पादनावर गडकरी (Nitin Gadkari) यांनी चिंता व्यक्त केली आहे.

Nitin Gadkari
नवनीत राणांना जेलमध्ये हीन दर्जाची वागणूक; वॉशरूमला जाण्याची परवानगी नाकारल्याचा आरोप

शिवाय माझ्याकडे दोन दिवसांपूर्वी ब्राझीलचे शिष्टमंडळ आलं होतं तिथे दुष्काळ पडला, असं ते सांगत होते. तिथे दुष्काळ म्हटल्याबरोबर आमदार बबनदादा शिंदे हसले, पण ब्राझीलमध्ये जर साखर वाढली तर २२ रुपये सारखेचा भाव होईल आणि तुम्हाला ऊसाचा भाव काही कमी करता येणार नाही. कारण तुम्हाला राजकारण करायचंय. तुम्हाला आहे तेवढाच भाव द्यावा लागेल. मग तेव्हा काय स्थिती होईल असही गडकरी म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com