परभणी : नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याची गरज होती. अतिवृष्टीची मदत सुद्धा पूर्णपणे शेतकऱ्यांपर्यंत पोचलेली नाही. सरकार शेतकऱ्यांच्या समस्येवर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी परभणीत केला आहे. (Live Marathi News)
अंबादास दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली (Parbhani) परभणीत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यलयावर विराट मोर्चा काढण्यात आला होता. मोर्च्यात हजारोंच्या संख्येने ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांबरोबर जिल्ह्यातील (Farmer) शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना दानवे बोलत होते.
परभणी जिल्ह्यातील एकूण 90 टक्के गावात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज होती. परंतु, सरकारने असे केले नाही. याच मुद्यावरून विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आज सरकारला शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर धारेवर धरले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.