परभणी : रात्रीची लाईट शेतकऱ्यांना देणे हे शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरू शकतो. मात्र, तरीदेखील महावितरणाकडून शेतीसाठी रात्रीचा वीज पुरवठा दिला जात आहे. आपली पिके वाळू नये म्हणून शेतकरी (Farmer) देखील रात्रीच्या अंधारात आपल्या जीवाची पर्वा न करता पाणी द्यायला जातात. अनेकदा ही गोष्ट शेतकऱ्यांच्या जीवावरही बेतत आहे. अशीच एक घटना परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात घडली आहे. कडाक्याच्या थंडीत शेतीला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
वैजनाथ आबाजी आघाव (वय -60 वर्षे) असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. आघाव हे वाई गावाचे (Parbhani) माजी सरपंच होते. सोमवारी रात्री ते आपल्या शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी कडाक्याच्या थंडीत शेतात गेले. मोटार चालू करून परत येतो असं कुटुंबीयांना सांगत ते घराबाहेर पडले. मात्र शेतात जात असताना, वाटेतच त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, पहाटेचे पाच वाजल्यानंतरही आघावर हे घरी परतले नसल्याने घरच्या मंडळींनी सोमवारी सकाळी शेतात जावून पाहणी केली असता ते मृत अवस्थेत आढळून आले. घरातील कर्ता पुरुष अचानक गेल्याने आघाव कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
वैजनाथ आघाव यांचा मृत्यू पडलेल्या थंडीने झाला असल्याचा अंदाज कुटुंबीया व्यक्त केला आहे. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन मुले, दोन भाऊ, दोन बहिणी असा मोठा परिवार आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सध्या रब्बी पीकाचा हंगाम सुरू असून शेतात गहू, हरभरा, ज्वारी आदी पिके घेतली जात आहेत. मात्र, मुबलक पाणी असूनही शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत नाही. त्यामुळे शेतकर्यांना रात्रीच्या वेळी पिकांना पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांसोबत दुर्देवी घटना घडत आहेत.
Edited By Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.