बुलढाणा : मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आणि नाव देण्यावरुन वादग्रस्त असलेल्या समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) कामाच्या अडचणींमध्ये वाढच होत आहे. बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाचा 500 मीटर लांब असलेल्या निर्माणाधिन पुलाचा मोठा (गर्डर) भाग काल (बुधवार दि. २७ एप्रिल) सायंकाळी कोसळला आहे. हा पूल सिंदखेडराजा (Sindkhedraja) जवळील पिंपळखुटा या गावाजवळ दोन डोंगराळ प्रदेशाला जोडणाऱ्या निर्माणाधीन उड्डाणपुल होता. सुदैवाने कामावरील मजूर बाजूच्या शेतात जेवण करत असल्यामुळे जीवितहानी झालेली नाही. मात्र, कोसळलेल्या गर्डरखाली एक ट्रेलर गाडला गेला आहे.
यापूर्वी देखील समृद्धी महामार्गावरील उन्नत वन्यजीव मार्गाच्या कमानीचा भाग कोसळून एका कामगाराचा मृत्यू झाला होता तर २ कामगार जखमी झाले होते. नागपूरपासून ३६ किलोमीटर अंतरावर समृद्धी महामार्गावर ही २४ एप्रिला दुर्घटना घ़ली होती. दरम्यान, लोकार्पणाच्या घाईने कंत्राटदार जलद गतीने काम करत असल्याने अशा दुर्घटना घडत असल्याची माहिती समोर येत आहे.
वाद आणि श्रेयवाद -
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचं नागपूर ते वाशिमच्या (Nagpur to Washim) सेलू बाजारपर्यंतच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण 2 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची चर्चा एकीकडे आहे. तर हे उद्धाटन पुढं ढकलण्यात येणार असल्याच्याही चर्चा सुरु आहेत. मात्र या पुलाच्या उद्धाटनाआधीच एका काँग्रेस नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी कार चालवल्याने वाद निर्माण झाला होता. तर या महामार्गाला बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे नावं देण्यावरुन देखील वाद झाला होता.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.