सांगली: कोरोनाच्या काळात (Coronavirus) जसे सर्व सामान्य जनतेला निर्बध लावले जातात, तसेच राजकीय नेत्यांनी ही कोणतेही कार्यक्रम न करता स्वतःला निर्बध घालणे गरजेचे आहे. असे वक्तव्य आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले. ते सांगली मध्ये कोरोना लसीकरण केंद्राच्या उद्घाटना प्रसंगी बोलत होते.
सांगलीतील भगवान महावीर कोविड हॉस्पिटल व डॉ.भबान हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना लसीकरण (Corona Vaccination) केंद्रा सुरू करण्यात आले आहे. यावेळी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. यावेळी ते म्हणाले कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी लसीकरण महत्वाचे आहे. तसेच तिसऱ्या लाटेसाठी प्रशासन आणि सरकार सज्ज आहे. लोकांनी लसीकरण करून प्रशासनाला मदत करावी असे आव्हान ही करण्यात आले.
दरम्यान, राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या कमी होत आहे. त्याच बरोबर सक्रिय रुग्णांची संख्या देखील कमी होत आहे. परंतू तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासनाने प्रसत्न सुरु केले आहेत. तिसऱ्या लाटेची तिव्रता कमी करायची असेल तर लसीकरणावर जोर दिला पाहिजे असे तज्ञांचे मत आहे.
Edited By: Pravin Dhamale
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.