Political News : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठी आगपाखड होताना दिसत आहे. मात्र काल वेगळंच चित्र पहायला मिळालं. आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील विनोदासह आदित्य ठाकरेंच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काल विधिमंडळात उपस्थित झालेल्या या मुद्द्यावर आदित्य ठाकरेंनी आज स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. (Aaditya Thackeray)
आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांमधील विनोदाने आदित्य ठाकरे खरोखर लग्न केव्हा करणार अशी चर्चा रंगली आहे. आज पत्रकारांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे लग्न केव्हा करणार यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'मला एवढ्यात लग्नाच्या बेडीत अडकवू नका काल फडणवीस यांनी राजकीय धमकी दिलेली आहे. काल मी वारेगाव वर प्रश्न विचारला असता त्यामध्ये गमतीत ते मला असं म्हणाले होते, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे.
हिंदू नवीन वर्ष पाडव्याच्या शुभेच्छा देत ते पुढे म्हणाले की, 'नवीन वर्षाचा संकल्प हा कधीकधी काही जण एक दोन दिवस करत असतात मात्र मी दररोज करतो. मी प्रत्येक दिवशी काम करण्यावर विश्वास ठेवतो आणि तेच मी करतो.'
यावेळी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर आदित्य ठाकरेंनी निशाणा साधला. ते म्हणाले की, अब्दुल सत्तार हे नक्की शेतकऱ्यांच्या बांधावर गेले की गुवाहाटीला गेले होते ते एकदा त्यांना विचारा. राज्यात अनेक ठिकाणी पाऊस झालेला आहे गारपीट झालेली आहे शेतकरी हा अडचणीत आहे त्यांना धीर देणे गरजेचे आहे. जरी सरकार घटनाबाह्य असलं तरी प्रत्येकाचं ते कर्तव्य आहे. तसेच आज मी राजकीय गोष्टींवर बोलणार नाही, असं म्हणत त्यांनी यावर अधिक बोलणं टाळलं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.