संजय डाफ
''सरकारला थकीत वीज बिलाची सावकारासारखी जबरदस्तीने वसुली कारायची आहे, म्हणून सरकार कडून बाऊ केला जात आहे, कोरोना मुळे एकीकडे शेतकरी आणि सामान्य नागरिक अडचणीत असताना त्यांना मदत करण्याऐवजी सरकार त्यांच्याकडून जबरदस्तीने वसुली करायची असल्याने हे नाटक सुरू आहे,'' अशी टिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केली आहे. ऊर्जा मंत्र्यांनी जे प्रेझेन्टेशन केले, त्यातून स्पष्ट होते की त्यांच्या काळात किती थकबाकी वाढली, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.
हे देखील पहा-
आता निवडणुका लागल्या त्यामुळे आम्ही त्याला सामोरं जाऊ, मात्र सरकार जे बोलतेय ते कृतीत दिसत नाही हे यातून स्पष्ट झाले आहे. असे स्पष्टीकरणही फडणवीसांनी यावेळी दिले आहे. तर, कुंभकोणी संदर्भातला प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला पाहिजे, कारण कुंभकोणी यांना मुख्यमंत्र्यांनी अपॉईंट केले आहे, ते मागील सरकारचे कंटिन्यू झालेले ऍडव्होकेट जनरल नाही, मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिकारात त्यांना अपॉईंट केलं. असा त्यांनी म्हटलं आहे.
चंद्रकांत दादा पाटील यांनी आधीच स्पष्ट केले आहे की प्रवीण दरेकर बोलीभाषेत असं बोललं आहे, त्यामुळे त्याचे वेगवेगळे अर्थ काढणं योग्य नाही. सध्या एनसीपी कडे कुठले मुद्दे नाहीये, त्यामुळे असे मुद्दे हाताशी घेऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहे. असा खुलासाही त्यांनी केला आहे.
Edited By- Anuradha
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.