
''तुम्ही मागेल तितके पुरावे आम्ही देऊ. सरसकट अध्यादेश काढता येईल इतके पुरावे आहेत. सरकारचा अमूल्य वेळ आम्हाला वाया घालवायचा नाही म्हणून पुरावे नसतील तर पुरावे देऊ'', असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आवाहन केलं आहे.
आज पत्रकार परिषद घेऊन ते म्हणाले की, ''मनातून इच्छा असेल तर एक कागद पुरेसा आहे. आम्हाला तुम्हास वेठीस धरायचे नाही. आता तज्ज्ञ ही द्यायला तयार आहोत.''
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
सरकारला आवाहन करताना जरांगे पाटील म्हणाले की, ''हैदराबाद संस्थानपासूनचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. सरकारच्या समितीला सर्व पुरावे आम्ही तेव्हाच देणार होतो. मात्र समितीने कामच केलं नाही. त्यामुळे आता जर सरकार मराठा आरक्षणासाठी कायदा करण्यास तयार असेल तर सरकारचा वेळ वाचवण्यासाठी मी तयार आहे.'' (Latest Marathi News)
ते म्हणाले की, ''माझ्याकडे सरकारसाठी सर्व पुरावे आहेत. मराठा समाज कुणबी असल्याचे हे पुरावे असून हैदराबाद संस्थानची कागदपत्रं आहेत. सरकारला या कागदपत्रांच्या आधारे एका दिवसात अध्यादेश काढता येईल.''
मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, ''सरकारला टिप्परभर पुरावे पाहिजेत का? माझ्याकडे एक असा कागद आहे, तेवढ्यावरच अध्यादेश निघू शकतो. सरकार म्हणेल अधिवेशन नाहीये. परंतु त्याचीही गरज नाही. आमच्याकडे अधिकृत कागदपत्रे आहेत.''
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.