रत्नागिरी : गेल्या तीन चार दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. विशेषतः राजापूर शहरात पडणा-या पावसामुळे rajapur rain update येथील जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत झाले आहे. येथे रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे राजापूर तालुक्यातील कोदवली आणि अर्जुना नदीला पूर आला आहे. (rain-update-rajapur-kodavali-arjuna-river-flooded-ratnagiri-marathi-news)
राजापूरच्या बाजारपेठेत पाणी शिरले आहे. याबराेबरच छत्रपती शिवाजी महाराज चौकात सध्या पाणी शिरले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजापूरला पुराचा वेढा निर्माण झाला आहे. दुसऱ्यांदा राजापूरला पुराचा फटका बसला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यास रविवारपासून पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. गेल्या दाेन दिवसांत या भागात पाऊस सुरुच आहे. राजापूर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूरपरिस्थिती साेमवारी निर्माण झाली हाेती. आज (बुधवार) नदीचे पाणी शहरातील बाजारपेठेत सकाळपासून भरण्यास सुरुवात झाली हाेती. शहरातील चौकात पाणी भरू लागल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
येत्या तीन दिवसांसाठी रत्नागिरी जिल्ह्यात रेड अलर्टचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यामुळे या भागात माेठ्या प्रमाणात पाउस पडू शकताे अशी शक्यता आहे. सध्या येथे पावसाची संततधार सुरु राहिल्याने नद्यांची पाणी पातळी वाढू शकते. यामुळे या भागात पुराचा धोका आणखी वाढू शकतो.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.