
नांदेड : शेतकऱ्यांचे (farmers) प्रश्न सुटत असतील तर आम्ही कुठेही नमाज (namaz) पडू, हनुमान चालीसा (hanuman chalisa) म्हणू असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (swabhimani shetkari sanghatana) नेते राजु शेट्टी (raju shetti) यांनी नांदेड (nanded) येथे नमूद केले. दरम्यान केंद्र आणि राज्य सरकार शेतक-यांचे प्रश्न साेडविण्यात सपशेल फेल गेल्याचे शेट्टींनी नमूद केले. (Raju Shetti Latest Marathi News)
राजू शेट्टी हे नांदेड दाै-यावर आले आहेत. आज माध्यमांशी संवाद साधताना शेट्टी यांनी राज्यातील महत्वाचे प्रश्न बाजूला पडू लागले आहेत. नकाे त्या गोष्टींवरुन वाद निर्माण केला जात आहे. त्यातून धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरण केले जात आहे असे नमूद केले.
राजु शेट्टी म्हणाले एकादशीच्या दिवशी पंढरपुरात (pandharpur) जमलेल्या लाखों भाविक पांडुरंगाचे दर्शन झालं की जेवणासाठी चंद्रभागेच्या वाळूवर बसतात. तेथील माेकाट कुत्र्यांना त्या भाक-यांवर फडशा पाडायचा असताे. मात्र तेथे वारकरी असल्याने कुत्र्यांना भाक-या मिळविण्यासाठी धडपड करावी लागती.
ही कुत्री एकमेकांत भांडतात. भुकुंन भुकुंन कालवा करतात. भाेळ्या भाबड्या वारक-यांना हे पहावत नाही. ते त्या कुत्र्याचं भांडण सोडवायला उठतात. त्याचवेळेस कुत्रे वारकऱ्यांची भाकरी घेऊन पसार होतात अशीच काहीशी अवस्था आज महाराष्ट्रात झालेली आहे असे शेट्टी यांनी नमूद केले.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.