
रणजीत माजगावकर
Kolhapur News : स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी राज्यातील वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बदल्यांबाबत मोठा दावा केला आहे. राज्यात सध्या बदल्यांचा हंगाम सुरू आहे. बदल्यासांठी लाखांचे पट्टीत दर निघाले आहेत. तलाठ्यासाठी पाच लाख, तहसीलदारसाठी 25 लाख तर जिल्हाधिकारी यांच्या बदलीसाठी 5 कोटींचे दर ठरले असल्याचा दावा राजू शेट्टी यांनी केला आहे.
राज्यात भ्रष्टाचार प्रचंड वाढला आहे. सध्या बदल्यांसाठीचे आकडे अचंबित करणारे आहेत. पैसे घेणारा बोलत नाही, पण पैसे देणारे अधिकारी उघडपणे बोलतात. आम्ही एवढे पैसे देऊन इथे आलो आहेत. आम्हाल कोण जाब विचारणार आहे. कारण जाब विचारणाऱ्यांनाच आम्ही पैसे दिले आहेत. असं बोलून अधिकारी सर्रास सर्वसामांन्यांकडून लाच मागतात. अशाप्रकारे प्रशासनाला भ्रष्टाचाराची किड लागली आहे. (Latest Marathi News)
प्रत्येक खात्यात भ्रष्टाचार सुरु आहे. याचा त्रास सर्वसामानांना होत आहे. बदल्यांमध्ये अधिकाऱ्यांच्या रँकनुसार दर ठरले आहेत. शिक्षण संचालक, अभिंयता, पोलीस अधिकारी यांच्यासाठी एक रेट कार्ड ठरलेले आहेत. बदल्यांच्या अक्षरश: बाजार मांडला जात आहे. मग अशा भ्रष्ट व्यवस्थेविरोधात माझ्यासारख्याने का आवाज उठवू नये, असा सवालही राजू शेट्टी यांनी उपस्थित केली. (Maharashtra Politics)
मी या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. याचं उत्तर मला मिळणार नाही याची मला खात्री आहे. या भ्रष्टाचाराविरुद्ध राज्यभर रान उठवणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. तसेच आरोप खोटे असतील तर मला कोर्टात खेचा, नाहीतर माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा करा, असं आव्हानही राजू शेट्टीं यांनी सरकारला दिलं आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.