राज्यसभा निवडणूक: भाजपचे आमदार फुटणार?, काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यामुळं चर्चेला उधाण

राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकीवरून वातावरण चांगलंच तापलं आहे
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSaam Tv

मुंबई : राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकीवरून (Rajya Sabha Election) वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची चर्चा होती. मात्र ऐनवेळी सत्ताधारी (Mahavikas Aghadi) आणि विरोधकांमधील (BJP) बोलणी फिसकटल्याने आता निवडणूक मतांद्वारे होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे राज्यसभेची सहावी जागा जिंकण्यासाठी दोन्ही बाजूंनी ताकद पणाला लावली जात आहे. इतकंच नाही तर, दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप आणि दावे-प्रतिदावे केले जात आहेत. अशातच भाजपने आपले आमदार सांभाळले पाहिजे असं विधान कॉंग्रेस नेते सतेज पाटील (Satej Patil) यांनी केलं आहे. (Rajya Sabha Election 2022 Latest News)

Devendra Fadnavis
राज्यसभेची निवडणूक आम्हीच जिंकणार; भाजपने यात पैसा वाया घालवू नये : संजय राऊत

'भाजपने राज्यसभेची निवडणूक लादली, ही निवडणूक बिनविरोध करणं हे अभिप्रेत होतं. महाविकास आघाडीकडे क्लियर नंबर आहेत . मतांद्वारे विजय स्पष्ट होईल . या सरकारला कुठलाही धोका नाही किंबहुना भाजपचीच मतं बाजूला जातील. त्यामुळे भाजपाने आपले आमदार सांभाळले पाहिजेत' असा इशारा सतेज पाटील यांनी भाजपला दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

दुसरीकडे काँग्रेसमधल्या (Congress) नाराजीबद्दलही सतेज पाटलांनी भाष्य केलं आहे. कॉंग्रेसमध्ये कोणतीही नाराजी नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. काँग्रेसमध्ये नाराजी नाही. इम्रान प्रतापगढी हे राष्ट्रीय पातळीवर काम करणारे नेते आहेत, त्यामुळे त्यांना उमेदवारी दिल्याचं सतेज पाटलांनी स्पष्ट केलं आहे. तर भाजपाच्या विखारी प्रचाराला काँग्रेस प्रबळपणे उत्तर देण्याचे प्रयत्न करत असल्याचाही दावा सतेज पाटलांनी केला आहे.

Devendra Fadnavis
पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच; धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

दरम्यान, या निवडणुकीत घोडेबाजार होण्याचा आरोप विविध नेत्यांकडून होत आहे. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी भाजपकडे पुरेसं संख्याबळ नाही. त्यामुळे हा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजप अपक्षांवर दबाव आणतंय. ईडी, सीबीआय (CBI) सारख्या तपासयंत्रणांद्वारे अपक्ष आमदारांना भीती दाखवली जातेय, असा आरोप संजय राऊत यांनी केला. मात्र भाजपने कितीही घोडेबाजारी केली, कितीही पैसा ओतला तरीही सहावी जागा मविआ जिंकणार आहे. त्यामुळे भाजपने यात पैसा वाया घालवू नये, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला होता.

संजय राऊत यांच्या इशाऱ्यानंतर आता कॉंग्रेस नेते सतेज पाटील यांनी सुद्धा भाजपने आपले आमदार सांभाळावेत असा इशारा दिल्यानंतर राज्यसभा निवडणुकीत नेमकं काय होणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com