Amravati: यशोमती ठाकूर पालकमंत्री झाल्यापासून जिल्ह्यात दंगली; नवनीत राणांचा आरोप
अमर घटारे -
अमरावती : यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) पालक मंत्री झाल्या तेव्हापासून जिल्ह्यात दंगली घडत आहेत. असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केलं आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर (Achalpur) येथे रविवारी मध्यरात्रीला झेंडा काढण्यावरुन वरून वाद झाला आणि याचं रूपांतर दंगलीमध्ये झालं होतं. त्यामुळे प्रशासनाला तात्काळ या परिसरात संचारबंदी लागू करावी लागली होती. शांतता व सुव्यवस्था याठिकाणी राहावी याकरिता गेल्या तीन दिवसापासून याठिकाणी संचारबंदी लागू आहे. (Navneet Rana criticise Yashomati Thakur)
दरम्यान अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी अचलपूर पोलीस स्टेशनला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. यासंदर्भात सर्वांनी शांततेने राहून एकमेकांना सहकार्य करावे असे आवाहन देखील नवनीत राणा यांनी केला आहे.
हे देखील पाहा -
भाजप नेते अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर याच दंगलीच्या मास्टरमाइंड असल्याचं वक्तव्य केलं होतं त्यावर आपण हा प्रश्न बोंडे यांनाच विचारावा मात्र, यशोमती ठाकूर पालक मंत्री झाल्या तेव्हापासून जिल्ह्यात दंगली घडत आहेत. असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केल्याने आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
Edited By - Jagdish Patil
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.