सातारा : खिरखंडी (khirkhandi) येथील व्याघ्र प्रकल्प पुनर्वसनाचा प्रश्न आठ दिवसांत मार्गी लावला जाईल असा विश्वास जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी (ruchesh jayvanshi) यांनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केला. साताऱ्यातील (Satara) खिरखंडी येथील विद्यार्थ्यांचा (students) शिक्षणासाठी होणारा खडतर प्रवासाची साम टिव्हीने बातमी दाखवली त्यानंतर तेथे मदत पाेहचली. आता जिल्हाधिकारी जयवंशी रुजू झाल्यानंतर त्यांनी खिरंखंडीस (khirkhandi News) ठिकाणी भेट देऊन ग्रामस्थांची भेट घेतली. त्यानंतर साम टीव्हीशी बाेलताना त्यांनी मुलांच्या शिक्षणाचा (education) प्रश्न मार्गी लागला आहे. ग्रामस्थांनी मुलांना वसतीगृहात ठेवण्यास मान्यता दिल्याचे सांगितलं. (Ruchesh Jayvanshi Latest Marathi News)
जिल्हाधिकारी जयवंशी म्हणाले खिरखंडी येथील ग्रामस्थांशी मी स्वत: चर्चा केली. पुनर्वसन मान्य नसल्याने या गावातील सहा खातेदार हे अद्यापही मूळ खिरखंडी या गावात वास्तव्य करत आहेत. त्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा विषय बिकट बनला होता.
ग्रामस्थांच्या अडचणी समजून घेतल्यानंतर मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या जीवाचा प्रश्न असल्याने मुलांना वसतिगृहात ठेवण्याची विनंती केली. या निर्णयास ग्रामस्थांनी मान्यता दिली आहे. तसेच या कुटुंबाचे लवकरच पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावला जाईल असेही जिल्हाधिकारी जयवंशी यांनी नमूद केले.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.