
बीड - नामदेव जाधव यांची आत्महत्या नसून सरकार व व्यवस्थेने केलेला खूण आहे. त्यामुळं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल करा. अशी मागणी शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी केली आहे. बीडच्या (Beed) हिंगणगावातील आत्महत्याग्रस्त पीडित शेतकरी कुटुंबाची भेट घेऊन, सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी त्यांचे सांत्वन केले. यावेळी ते बोलत होते.
हे देखील पाहा -
पुढे बोलताना ते म्हणाले, की महाराष्ट्रातील अतिरिक्त ऊसा संदर्भात सर्व माहीत असताना, सरकारने व प्रशासनाने यासंदर्भात उपाययोजना केली नाही. म्हणून शेवटी फड पेटवून देऊन नामदेव जाधव या शेतकऱ्याला स्वतःला संपून घ्याव लागल. यावरून आता ऊस उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे, याची प्रचिती येते.
नामदेव जाधव या शेतकऱ्याकडे खाजगी सावकारी कर्ज होते. त्याचबरोबर वडिलांचे आजारपण आणि स्वतःचा देखील आजारपणा यामुळें झालेला खर्च सावकाराने लावलेल्या तगादा, त्यामुळं शेतकऱ्यांने हे पाऊल उचलले आहे. याला सर्वस्वी जबाबदार सरकार आहे.असा घणाघात शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी सरकारवर केला आहे.
Edited By - Shivani Tichkule
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.