- विनायक वंजारे
सिंधुदुर्ग : महाराष्ट्रात (maharashtra) राष्ट्रपती राजवट (president's rule) लागू झाली तर जनतेला किंचितही वाईट वाटणार नाही कारण दरोडेखोरांना घरातून पळवायला जी मदत लागेल ती कोणतीही मदत राज्याच्या मदतीला धावून आली तर त्याचे जनता स्वागत करेल असे मत रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (sadabhau khot)यांनी येथे (sindhudurg) व्यक्त केले. (Sadabhau Khot latest Marathi news)
माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण (malvan) येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावरून जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्राचा (Jagar Shetkaryancha Aakrosh Maharashtracha) या राज्यव्यापी अभियानाची सुरुवात केली. यावेळी माध्यमांशी बाेलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.
सदाभाऊ म्हणाले विश्वासघाताने आलेले हे सरकार असून, सरकार मधील लोक गुंडागर्दी करत आहेत. विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे हे राज्य आम्हाला गुंडाचे व्हायला द्यायचं नाहीये. राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी आपल समर्थन असल्याचेही सदाभाऊंनी नमूद केले.
दरम्यान जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्राचा हे अभियान उद्या रत्नागिरी, एक मे राेजी काेल्हापूर, दाेन मे राेजी सांगली, सात मे राेजी सातारा, आठ मे राेजी पुणे तसेच नऊ मे राेजी नाशिक असे असेल अशी माहिती संयाेजकांनी दिली.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.