पंढरपूर : एफआरपीच्या कायद्यात बदल करणार नसल्याचे आश्वासन केंद्र सरकारने दिल्याचे आज (रविवार) रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी दिले. काेल्हापूरला निघालेल्या सदाभाऊंनी पंढरपूर रेल्वे स्थानकावर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले एफआरपीच्या कायद्यात बदल करा असा प्रस्ताव राज्य सरकारने पाठवला असला तरी पूर्वीच्या कायद्यात कोणताही बदल केला जाणार नाही. पूर्वी प्रमाणेच १४ दिवसांत एफआरपीची रक्कम शेतक-यांना देणे बंधनकारक राहणार आहे. शेतक-यांनी चिंता करु नये असे आश्वासन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुश गोयल यांनी दिले आहे असे सदाभाऊंनी नमूद केले. sadabhau-khot-central-government-assures-one-time-frp-solapur-marathi-news-sml80
अलीकडेच राज्य सरकारने एफआरपीच्या कायद्यात बदल करावा असा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता. त्याला रयत क्रांती संघटनेने विरोध करत राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन केले होते. त्यानंतर खाेत यांनी वाणिज्य मंत्री पियुश गोयल यांची दिल्लीत भेट घेवून एफआरपीच्या कायद्यात बदल करु नये असे विनंती केली होती. यावेळी वाणिज्य मंत्री पियुश गोयल यांनाही एफआरपीच्या कायद्यात कोणताही बदल केला जाणार नाही. पूर्वी प्रमाणेच शेतक-यांना १४ दिवसांत एफआरपीची रक्कम देणे कारखान्यांना बंधनकारक राहणार आहे असे पत्र दिले आहे.
दरम्यान या निर्णयाचे स्वागत रयत क्रांती संघटनेने केले आहे. सदाभाऊ खोत दिल्लीहून कोल्हापूरला जात असताना त्यांचे आज (रविवार) पंढरपुर रेल्वे स्थानकावर शेतक-यांनी स्वागत केले. त्यावेळी रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांना सदाभाऊंना साखर खाऊ घातली. साखर भरवितानाचा क्षणी सर्वाना भरुन आले. यावेळी रयत क्रांती संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक भोसले यांनी सदाभाऊंचे स्वागत केले.
edited by : siddharth latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.