सातारा : जिल्ह्यातील पळसावडे गावात दोन दिवसापूर्वी वनरक्षक दाम्पत्याला मारहाण झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात महाराष्ट्रातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आज रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांनी अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांची भेट घेतली. त्यानंतर साम टीव्हीशी बाेलताना खाेत यांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (shambhuraj desai) यांच्यावर येथील कामकाजावरुन टीका केली.
संबंधित माजी सरपंच रामचंद्र जानकर याच्यावर कडक कारवाई करून फास्ट ट्रॅक कोर्टात (court) लढविण्यात यावी तसेच ज्या माजी सरपंचाने अशा किती कार्यालयांना वेठीस धरले आहे का याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे अशा पद्धतीने कृत्य करणे म्हणजे राज्यात मोगलाई लागून गेली आहे का? असा खडा सवाल खाेत यांनी विचारला आहे.
खाेत म्हणाले साताऱ्याचे (satara) गृहराज्यमंत्री हे नेहमी आभाळात वार करतात पण त्यांच्या जिल्ह्यात काय चाललंय हे त्यांना माहीत नाही. असे गुंड जर बिनधास्त फिरत असतील तर या गुंडांना गृहराज्यमंत्री यांचे अभय आहे का अशी शंका खोत यांनी व्यक्त केली आहे.
edited by : siddharth latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.