सांगली : राज्याचे आरोग्य खाते यमदूत म्हणून जनतेसमोर उभे असून राजेश टोपे यांनी आता लोकांना टोप्या घालणे बंद करावे अशी घणाघाती टीका माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयातील आगीत 10 जणांचा झालेल्या मृत्युवरून आमदार खोत यांनी ही टीका केली आहे. ते सांगलीच्या इस्लामपूर मध्ये बोलत होते.
हे देखील पहा :
राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या काही दिवसांपासून विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. रयत क्रांती संघटनेच्यावतीने आमच्या इस्लामपूर या ठिकाणी बसस्थानकामध्ये कृषी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय आमरण उपोषण करण्यात आले. या आंदोलनामध्ये शेकडो एसटी कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी शेवटपर्यंत लढा सुरूच ठेवणार,असल्याचे सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केले आहे.
तसेच यावेळी अहमदनगर जिल्ह्यातल्या शासकीय रुग्णालयातील आगीत 10 जणांच्या मृत्यू दुर्घटने वरून आरोग्य मंत्री आणि आरोग्य खात्यावर सदाभाऊ खोत यांनी सडकून टीका केली आहे. आरोग्य खाते गटारगंगा झाली असून आज राज्याच्या जनतेसमोर आरोग्य खाते यमदूत म्हणून उभा आहे. त्यामुळेच अहमदनगर शासकीय रुग्णालयातील असो किंवा याआधीही रुग्णालयात आगीच्या दुर्घटना घडल्या आहेत. मात्र, या सरकारला केवळ वसुली करण्याशिवाय काहीच सुचत नाही. तसेच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आता जनतेला टोप्या घालणे बंद करावे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.