- तबरेज शेख
नाशिक : जीवनावश्यक वस्तूमध्ये कांदा (onion) टाकण्यात आला आहे. कांदा न खाल्ल्याने कोणी मेला आहे का आजपर्यंत तरी. तुम्ही तरी सांगू शकता का. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूमधून कांदा वगळावा अशी आमची मागणी आहे. ही मागणी राज्य सरकारने केंद्राकडे मांडावी असे सदाभाऊ खाेत (sadabhau khot) यांनी येथे (nashik) नमूद केले. दरम्यान राज्य सरकार हे करणार नाही कारण हे सरकार फक्त लोणी खाण्यात व्यस्त आहे अशी टीका देखील खाेत यांनी महाविकास आघाडी सरकारवर (mahavikas aaghadi) केली आहे. (sadabhau khot nashik latest marathi news)
निफाडच्या रुई गावात सन १९८२ नंतर पुन्हा कांदा परिषद होत आहे. आज (रविवार) या परिषदेत काही धाेरण ठरविली जाणार आहेत. सदाभाऊ खोत म्हणाले कधी कांदा रडवतोय कर कधी कांदा हसवतोय. निर्यात बंदी, नैसर्गिक संकट आणि इतर कारणामुळे नेहमी कांदा उत्पादक शेतकरी संकटात राहिला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्याप्रमाणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राजाश्रय मिळाला नाही अशी खंत व्यक्त करीत खाेत यांनी आजच्या परिषदेच्या माध्यमातून एक धोरण ठरवून ते राज्य आणि केंद्र सरकारकडे देणार असल्याचे स्पष्ट केले.
खाेत म्हणाले या धोरणावर विचार नाही झाला तर मग आरपारची लढाई लढणार. दरम्यान जीवनावश्यक वस्तूमध्ये कांदा टाकण्यात आला आहे. कांदा न खाल्ल्याने कोणी मेला आहे का? त्यामुळे कांदा जीवनावश्यक वस्तूमधून वगळावा ही आमची प्रमुख मागणी आहे. ही मागणी राज्य सरकारने केंद्राकडे मांडावी. मात्र राज्य सरकार हे करणार नाही कारण हे सरकार फक्त लोणी खाण्यात व्यस्त आहे अशी टीका खाेत यांनी केली.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.