'कृषीमंत्री गुवाहाटीत जाऊन बसला,असं बोलण्यापेक्षा...'; संभाजीराजेंनी व्यक्त केला संताप

संभाजीराजे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राज्यातील राजकीय परिस्थितीवर संताप व्यक्त केला.
sambhjajiraje chhatrapati
sambhjajiraje chhatrapati saam tv

बीड : 'राज्यातील शेतकरी अस्वस्थ आहेत. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना राज्यातील राजकीय अस्थिरता यामुळे शेतकरी आत्महत्या करेल. त्यामुळे ताबडतोब निर्णय घ्यावा. कृषिमंत्री गुवाहाटीमध्ये जाऊन बसला. असं बोलण्यापेक्षा उपाय योजना करा, अशी अपेक्षा करत संभाजीराजे छत्रपती यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राज्याच्या राजकीय परिस्थीतीवर संताप व्यक्त केला. तसेच संभाजीराजे (SambhajiRaje) यांनी शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावरूनही राज्यातील राजकीय परिस्थितीवर संताप व्यक्त केला. संभाजीराजे सध्या बीड (Beed) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. ( Maharashtra political Crisis News In Marathi )

sambhjajiraje chhatrapati
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना सर्वात मोठा धक्का; महाविकास आघाडीने घेतला 'हा' निर्णय

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, ' राज्यातील शेतकरी अस्वस्थ आहेत. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना राज्यातील राजकीय अस्थिरता यामुळे शेतकरी आत्महत्या करेल. त्यामुळे ताबडतोब निर्णय घ्यावा. राज्यात कुठलं सरकार येईल आणि कुठलं सरकार जाईल. याचा आम्हाला आणि शेतकऱ्याला काही देणेघेणे नाही, मात्र शेतकऱ्याचे प्रश्न महत्त्वाचे आहेत'.

पुढे बोलताना म्हणाले की ,'राज्यातील राजकीय परिस्थितीवर लवकरात लवकर यावर तोडगा निघाला पाहिजे. आजच्या राजकीय अस्थिरतेमुळे जनसामान्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. केवळ बोलून चालत नाही. कृषीमंत्री गुवाहाटी मध्ये जाऊन बसला, असं बोलण्यापेक्षा उपाय योजना करा, अशी अपेक्षा देखील छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना यावर तोडगा निघाला नाही, तर शेतकरी आत्महत्या करतील'

sambhjajiraje chhatrapati
Political Crisis: बंडखोर आमदारांवर कारवाई व्हावी; मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० हून अधिक आमदारांसह बंड केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संतापले आहेत. शिंदे गटातील तब्बल १६ बंडखोर आमदारांना शिवसेनेकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. आज सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची सुनावणी होत असताना, दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारने एकनाथ शिंदे यांच्याकडील सर्व खाते काढून घेतली आहे. जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जात आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com