
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गामुळे मुंबई-नागपूर प्रवास सुस्साट झाला आहे. मात्र समृद्धी महामार्गावरील नागपूर-शिर्डीदरम्यानचा पहिला टप्पा सुरु झाल्यापासून शेकडो अपघात या मार्गावर झाले आहेत. समृद्धी महामार्गावरील वाढणारे अपघात प्रशासनाचा चिंतेची बाब ठरत आहेत. त्यामुळे या अपघातांच्या कारणांचा शोध प्रशासनाकडून घेतला जात आहे. (Accident News)
सुरुवातीला समृद्धी महामार्गावरील वाहनांचा अतिवेग अपघातासाठी कारणीभूत ठरत असल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर टायर फुटत असल्याने अपघात होत असल्याचं समोर आलं. आता नवीन कारण समोर आलं आहे.
नागपूरच्या विश्वेश्वरैया राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थानमधील (VNIT)ट्रान्सपोर्ट विभागाच्या चार विद्यार्थ्यांनी तीन महिने अभ्यास केला. या अभ्यासातून सर्वाधिक अपघात संमोहनामुळे झाल्याची माहिती समोर आली आहे.या विद्यार्थ्यांनी महामार्गावर १०० किमी परिसरात हा अभ्यास केला.
महामार्ग विनाअडथळा सरळ असेल तर तुमची गाडीही एकाच मार्गाने धावते. यामध्ये तुमच्या शरीराची हालचाल स्थिर होते, तुमचा मेंदूदेखील अॅक्टिव्ह नसतो. या स्थितीला महामार्ग संमोहन असे म्हणतात. अनेक वाहनांचे संमोहनामुळे अपघात होत आहेत. एकूण अपघातापैकी ३३ टक्के अपघात हे महामार्ग संमोहनामुळे झाले आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.