विजय पाटील..
Sangali: लव्ह जिहादच्या नावाखाली समाजात विष पेरण्याच काम सुरू आहे. राजकीय पोळी भाजण्यासाठी जाती जातीत तेढ निर्माण केली जात आहे, मात्र आज जे समाजात सुरू आहे त्याच्या विरोधात ज्या प्रमाणात उठावा व्हायला पाहिजेल होता तसा तो होताना दिसत नाही, असा हल्लाबोल अजित पवार यांनी केला आहे. (Ajit Pawar)
सांगली जिल्ह्यातील कासेगाव येथे क्रांतिवीरांगना इंदुमती पाटणकर यांच्या स्मारकाचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित होते. यावेळी बोलताना अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली आहे.
काय म्हणाले अजित पवार..
"क्रांतीविरागणा इंदूमती पाटणकर यांनी स्वातंत्रलढ्या बरोबरच जाती अंताचा लढा उभा केला, त्याकाळी त्यांनी अनेक आंतरजातीय विवाह लावून दिले होते. आता सुद्धा याच भूमीतील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या दोन्ही मुलांनी आंतरजातीय विवाह केले आहेत," असे अजित पवार म्हणाले.
त्याचबरोबर पुढे बोलताना "अलीकडे सेक्युलर हया शब्दालाच कुठेतरी तिलांजली देण्याचा प्रयत्न काही जण करतात. हे आपल्या भारताच्या दृष्टीने अतिशय अडचणीचं होणार असल्याचेही" अजित पवार म्हणाले..
पहाटेच्या शपथविधीवर काय म्हणाले अजित पवार...
"प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नंतर एक स्टेटमेंट करून त्याच्यावर पडदा टाकलेला आहे.. सारखं सारखं ते उगाळू नका.. त्याला तीन वर्षे झालेली आहेत, त्यापेक्षा आपण महागाई बेरोजगारी आत्ताचे जे काही प्रश्न यक्ष प्रश्न निर्माण झालेले त्याच्याबद्दल या मीडियाचाही वापर करून आणि लोकांना जागृत करू," असे म्हणत पहाटेच्या शपथविधीवर बोलणे टाळले. (Sangali News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.