
सांगली : मिरजेत रत्नागिरी– नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वड्डीजवळ विटांनी भरलेला ट्रॅक्टर आणि बोलेरो या वाहनाचा भीषण (Accident) अपघात झाला होता. या अपघातात एक कुटुंब उध्वस्त होऊन सहा जणांचा बळी गेला आहे. या अपघात प्रकरणी (Sangli News) ट्रॅक्टर चालकासह मालकावर गुन्हा दाखल केला आहे. (Tajya Batmya)
रत्नागिरी– नागपूर राष्ट्रीय महामार्गावर विरुद्ध दिशेने जाणाऱ्या विटांनी भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा आणि बोलेरो वाहनाचा भीषण अपघात झाला होता. यात सहा जणांचा बळी गेला. याप्रकरणी ट्रॅक्टर चालक कैलास कोळी याच्यावर मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तर वड्डी गावचे माजी उपसरपंच राजू वजीर यांच्या मालकीचा वीट वाहतूक करणारा ट्रॅक्टर आहे.
चालकाकडे परवाना नाही
ट्रॅक्टरवर चालक असणाऱ्या कैलास कोळी यांच्याकडे वाहन चालक परवाना नसल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. वाहन चालक परवाना नसतानाही वाहन चालविण्यास दिल्याबद्दल आयपीसी 109 नुसार राजू वजीर यांनाही या गुन्हात आरोपी करण्यात आले आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.