
सांगली : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील नवेखेड सिमेवर असलेल्या फरशी ओढामध्ये साखर कारखान्याकडुन (Sugar Factory) केमिकल मिश्रणीत पाणी पाईपलाईनद्वारे सोडले जात आहे. यामुळे (Sangli News) ओढ्यातील हजारो मासे, जलचर प्राणी मृत्यू पडत आहेत. शिवाय दुर्गंधी देखील पसरली आहे. (Breaking Marathi News)
वाळवा तालुक्यातील नामांकित साखर कारखान्याचे केमिकल व मळी मिश्रित पाणी नागठाणे या ओढ्यातून हे केमिकल व मळी मिश्रित पाणी सोडत होते. पण नागठाणे गावातील लोकांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर हे केमिकल व मळी मिश्रण पाणी नवेखेड ओढ्यात पाईपलाईनद्वारे व ट्रँकरने सोडले जात आहे. यामुळे हजारो मासे, जलचर प्राणी मृत पडलेले आहेत. यांच्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष
काही करखान्यांकडून केमिकल व मळी मिश्रित पाणी सोडले जात आहे. त्यामुळे मासे मृत्युमुखी पडत आहेत. त्याचबरोबर जमीन ही नापीक होणार आहे. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि गावकऱ्यांनी केला आहे. लवकरात लवकर कारवाई करावी; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.