सांगली : सांगलीच्या जत तालुक्यातील उमदी येथे ओढ्यात अंघोळीसाठी गेलेल्या दोन्ही सख्ख्या बहिणींचा पाण्याचा अंदाज न आल्याने रेणुका शिवानंद ऐवळे (वय ७) आणि लक्ष्मी शिवानंद ऐवळे (वय ११) यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर त्याच्या सोबतच पोहायला गेलेला लहान भाऊ मायाप्पा शिवानंद ऐवळे (वय ६) हा बचावला आहे.
हे देखील पहा :
ऐवळे कुटुंबिय हे काही दिवसांपासून उमदी गावात ओढ्यालगत असणाऱ्या आपल्या घरात रहात होते. मोलमजुरी करून ऐवळे कुटुंब जगते. आज सकाळी घरातील सर्व लोक दुसऱ्यांच्या शेतात कामासाठी गेले होते. दोन मुली आणि एक मुलगा हे घरात होते. दुपारी आंघोळ करण्यासाठी दोन्ही बहीणी आणि एक भाऊ असे तिघे मिळुन ओढ्यात आंघोळ करण्यासाठी गेले.
परंतू , पाण्याचा अंदाज न आल्याने या दोन्ही सख्ख्या बहीणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर त्याचवेळी त्यांच्या सोबतच पोहण्यासाठी गेलेला लहान भाऊ मायाप्पा शिवानंद ऐवळे याला पाण्यात बुडताना ओढ्यालगत जनावरे राखणाऱ्या संभाजी माने या युवकाने पाहीले आणि त्यांने तात्काळ उडी घेत त्या चिमुकल्याचे प्राण वाचवले. या घटनेने उमदी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Edited By : Krushnarav Sathe
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.