
Jalna News : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार का आणि कसं? स्थापन झालं याची अनेक कारणं आजवर अनेकांना दिली. भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांना वेळोवेळी विविध कारणं या बंडाची दिली आहेत. आज राज्याचे आरोग्यमंत्री आणि शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांनीही बंड आणि सरकार स्थापनेबाबत मोठा गौप्यस्फोट केला. (Political News)
तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना, ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले. शिंदे-फडणवीसांनी समृद्धी महामार्गाचा गैरफायदा घेतला आहे.
या महामार्गाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देऊन या समृद्धी महामार्गाच्या कामात या जोडीने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. हा भ्रष्टाचार उघड होऊ नये म्हणून त्यांनी डाव आखला, असा गंभीर आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
शंभर काय त्याहून अधिक बैठका घेऊन शिवसेना संपून टाकण्याचा डाव रचत शिंदे, फडणवीसांनी आपलं सरकार स्थापन केलं, हे आता त्यांचीच लोक सांगत आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गाचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी या जोडीचा हा डाव असल्याचाही आरोप खैरे यांनी केला.
पन्नास खोके एकदम ओके बोलणार
सुप्रीम कोर्टाने जरी आमच्यावर सोशल मीडियावर बंदी आणली असली तरी आम्ही पन्नास खोके एकदम ओके म्हणणार असल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत खैरे दिली. आज सुप्रीम कोर्टाने ठाकरे गटाला सोशल मीडियावर पन्नास खोके एकदम ओके म्हणता येणार नसल्याचा आदेश दिला आहे. यानंतर खैरे यांनी सोशल मीडियावर नाही तर आम्ही प्रत्यक्षात मात्र म्हणणारच असल्याचं म्हटलं आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.