जळगाव : भाजप हे आपल्याच झाडावर वाढलेलं वेल, त्यांनी आपल्यालाच पोखरून टाकलंय अशी घणाघाती टीका शिवसेना (Shivsena) नेते गुलाबराव पाटील यांनी केली आहे. तसंच जळगाव शिवसेना संपवणारा अजून पैदा झालेला नाही असं वक्तव्यही गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केलं आहे. ते युवा सेनेच्या निश्चय मेळाव्यात बोलत होते.
ते म्हणाले, 'शिवसेना हा पक्ष दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे, जोपर्यंत हे विचार जिवंत आहेत, तोपर्यंत शिवसेना आहे.' असेही ते म्हणाले. तसंच शिवसेनेवर बरीच संकट आली, पण शिवसेना कायम आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आम्ही चालतो, असे ते म्हणाले मधल्या काळात छगन भुजबळ, नारायण राणे (Chhagan Bhujbal, Narayan Rane) यांच्यासारखे नेते शिवसेना सोडून गेले, पाणी वाहून गेलं पण काही लोक अजूनही कायम आहेत.
हे देखील पहा -
शिवसेनेवर बरेच लोक टीका करतात. पण शिवसेनाप्रमुख गेले कुठं? ते विचाराने आजही जीवंत आहेत, त्यामुळं टीका करणारे पागल आहेत, असा टोला त्यांनी युवा सेनेच्या (Yuvasena) निश्चय मेळाव्यात भाषण करताना विरोधकांना लगावला.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.