प्राची कुलकर्णी
पुणे : केंद्रात भारतीय जनता पक्षाची (BJP) सलग दोनवेळा सत्ता आल्यानंतर विरोधी पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केलीय. राष्ट्रवादी कॉंगेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी विरोधी पक्षांची महाआघाडीची मोट बांधायला सुरुवात केली. देशातील सर्वच विरोधी पक्षांना एकत्र आणून आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला जशाच तसे उत्तर देण्यासाठी पवार प्रयत्नशील आहेत. यासाठी देशभरात बैठकांचे आयोजन करुन विविध राजकीय विषयांवर खलबतंही झाली.
याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिलीय. शरद पवार यांनी देशाचं नेतृत्व करावे आणि आम्ही महाराष्ट्राचे नेतृत्व करू. देशातील विरोधी पक्षांना एकत्र करण्याची ताकद आणि क्षमता ही शरद पवारांकडे आहे, असा विश्वास ठाम विश्वास राऊतांना शरद पवार यांच्यावर आहे. तर शरद पवार आणि शिवसेना एकत्र येण्याची बाळासाहेबांची (Balasaheb Thackeray) भूमिका होती, असंही राऊतांनी स्पष्ट केलं.
पुण्यात राज्यसभेच्या निवडणुकीबाबत माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, कोण कोणा बरोबर आहे, हे १० तारखेला कळेल. महाविकास आघाडी स्थापन करताना आमच्याकडे 170 चे बहुमत होते. राज्यसभा निवडणुकीतही तुम्हाला हा आकडा पाहायला मिळेल. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जर संख्याबळ असेल, तर आनंद आहे. ते विधानसभेच्या वेळीही असंच बोलले होते. पुष्पा सिनेमात आमचाच डायलॉग वापरलाय, मी कुठलाही डायलॉग वापरला नाही. मी टार्गेटेड असेल तर मला अटक करा. दुसऱ्या निरपराध लोकांना का त्रास देता ? असा सवाल उपस्थित करत विरोधकांचा राऊतांनी समाचार घेतला.
शरद पवार आणि शिवसेना एकत्र येण्याची बाळासाहेबांची भूमिका होती. औरंगाबाद मध्ये ८ जून रोजी होणारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा अतिविराट होणार आहे. जसं प्रयागराज झालं, तसं औरंगाबादचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला आहे. संभाजीनगर नामकरण झालंय केंद्राकडे प्रस्ताव गेलाय, असंही राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले.
Edited By - Naresh Shende
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.