विनायक वंजारे
सिंधुदुर्ग : राणेंनी स्वतःच्या स्वार्थासाठी प्रत्येक वेळेला भूमिका बदलली. केंद्रीय मंत्रीपद मिळाल्यावर ते (BJP) भाजपची भाट गिरी करत आहेत. अशा शब्दात ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख अतुल रावराणे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)
केंद्रीय मंत्री असूनही तुम्ही या जिल्ह्यात एक तरी व्यवसाय आणलात का? असा सवाल उपस्थित करत कोकणातचं नव्हे; तर जिल्ह्यात तुमचं अस्तित्व संपल असल्याची टीका ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख अतुल रावराणे यांनी केली आहे. नारायण राणे पराभूत झालेले नेते असून भारतीय जनता पक्षाच्या कुबड्या घेऊन ते जिवंत आहेत. स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी राणे धडपड करत असल्याची टीकाही रावराणे यांनी केली आहे.
तर सगळे पुरावे बाहेर काढेल
नारायण राणे यांचा आमदार मुलगा स्टंटबाज आहे. जिल्ह्यात टक्केवारी व्यतिरिक्त कोणतेही काम तुमचा आमदार मुलगा करू शकला नाही. आमदार नितेश राणेनी यापुढे धमकी देऊ नये; तुमचे सगळे पुरावे बाहेर काढीन असा इशारा ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख अतुल राव राणे यांनी दिला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.