खळबळजनक: अहमदनगर जिल्ह्यात एकाच दिवशी सहा जणांचा मृत्यू

पाण्यात बुडून ३ वेगवेगळ्या घटनेत एकाच दिवशी ६ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले
खळबळजनक: अहमदनगर जिल्ह्यात एकाच दिवशी सहा जणांचा मृत्यू
खळबळजनक: अहमदनगर जिल्ह्यात एकाच दिवशी सहा जणांचा मृत्यूSaam Tv

अहमदनगर : पाण्यात बुडून ३ वेगवेगळ्या घटनेत एकाच दिवशी ६ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यात पती- पत्नी, बाप- लेक आणि सख्ख्या भावांचा यामध्ये समावेश आहे. एकाच दिवशी पाण्यात बुडून ६ जणांचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रथागत खळबळ उडाली आहे. या सहापैकी दोघा जणांचे मृतदेह सापडले आहेत. तर चौघांचा शोध सुरु आहे.

हे देखील पहा-

श्रीरामपूर तालुक्यामधील माळेवाडी या ठिकाणी मासेमारी ‌करणाऱ्या दाम्पत्याचा ओढ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे, कोपरगाव तालुक्यातील मुर्शदपूरजवळच गांजावाडी येथील नाल्यामध्ये बुडून बाप- लेकाचा जीव गेला आहे. राहुरीजवळ गणपती घाट या ठिकाणी असलेल्या मुळा नदी पात्रात बुडाल्यामुळे दोन सख्ख्या भावांचा देखील मृत्यू झाला.

खळबळजनक: अहमदनगर जिल्ह्यात एकाच दिवशी सहा जणांचा मृत्यू
Inflation: घरगुती एलपीजी सिलिंडर दरात मोठी वाढ

एका दिवसापूर्वीच नाशिक जिल्ह्यात वेगवेगळय़ा ठिकाणी पाण्यात बुडून २ जणांचा मृत्यू झाला आहे. बीड तालुक्यातील समर्थ छानवाळ (वय- १४) हा येवला तालुक्यातील वडगाव गावातील नदीपात्रात कुटुंबासह कपडे धुण्याकरिता गेला होता. तेव्हा पाण्यात खेळत असताना बुडाला आहे. तर दुसऱ्या घटनेत सुनील कोर हा (वय- ३७) हा अंबासन गावातील युवक मोसम नदीत गेला असता त्याला अचानक फीट आली होती. तो मोसम नदीच्या पात्रातील खड्डय़ात पडल्याने त्याचा देखील बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com