लातूर - जळकोट तालुक्यातील २५ गावांचा वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत अशी मागणी पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी केली आहे.
जळकोट तालुक्यातील ४७ गावांपैकी २५ गावे चार दिवसांपासून अंधारात आहेत. कोळनूर येथील ३३ केव्ही उपकेंद्रातील मुख्य रोहित्र जळाल्यामुळे हा वीजपुरवठा खंडित झाला आहे. परंतु मुख्य रोहित्र बसविण्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. विजेअभावी नागरिकांचे हाल होत आहेत. नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. जनावरांना पिण्याचे पाणी मिळत नाही. नागरिकांच्या घरात दळण नाही अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली असताना या गावाचा वीजपुरवठा सुरळीत करण्याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.
हे देखील पहा -
कोळनूर, करंजी, माळहिप्परगा, पाटोदा बुद्रुक पाटोदा खुर्द, तिरका, करंगी, सोनवळा, लाळी बुद्रुक, लाळी खुर्द, एवरी डोंगर कोनाळी, जंगमवाडी, डोंगरगाव, मरसांगवी, मंगरूळ, चोरगाव, एकुर्की, पनगरवाडी, विराळ यासह अनेक गावे चार दिवसांपासून अंधारात आहेत. या गावांत चार दिवसांपासून लाईट नसल्यामुळे पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. विजेअभावी गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
लाईट नसल्यामुळे उन्हाळ्यात नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. असे असले तरी वीज पुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास रस्त्यावर उतरून मुख्य अभियंता कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी दिला आहे.
Edited By - Shivani Tichkule
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.