Maharashtra Corona: निर्बंध कमी करण्याकडे राज्य शासनाचा कल - राजेश टोपे

राज्यात पहिल्या डोसचं 92 टक्के लसीकरण झालं असून 55 ते 60 टक्के दुसऱ्या डोसचं लसीकरण; राजेश टोपे यांची माहिती
Rajesh Tope
Rajesh TopeSaam Tv

जालना - गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. मुंबई-पुण्यातही देखील कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे पहायला मिळत आहे. काही जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असली तरी ती पुन्हा खाली येईल.आता निर्बंध वाढवण्याऐवजी कमी करण्याकडे राज्य शासनाचा कल आहे अशी माहीती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. ते जालन्यात बोलत होते.

हे देखील पहा -

सध्या राज्यात राज्य शासनाकडून लावण्यात आलेले निर्बंध टप्प्या-टप्प्याने कमी करण्यात येणार आहे असे देखील टोपे म्हणाले. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या मार्च अखेरीस खूप कमी होईल. कोव्हॅकसीनचा राज्यात काही प्रमाणात तुटवडा आहे. तुटवडा पडू नये म्हणून केंद्राने काळजी घेण्याची गरज आहे.तसेच राज्यात पहिल्या डोसचं 92 टक्के लसीकरण झालं असून 55 ते 60 टक्के दुसऱ्या डोसचं लसीकरण झाल आहे अशी माहितीही टोपे यांनी दिली.

Rajesh Tope
Viral Video: प्रेयसीला सुटकेसमध्ये लपवून हॉस्टेलच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न, मात्र गार्डने पकडले अन्..

पुढे ते म्हणले की, 12 ते 15 वर्ष वयोगटातील मुलांना ICMR सांगेल तेव्हा लसीकरण सुरू केलं जाईल. जगात लहान मुलांपासून सर्वांचं लसीकरण करण्यात येत आहे. या संदर्भात केंद्र सरकारने निर्णय घ्यावा त्याची राज्य सरकार अंमलबजावणी करेल असे देखील टोपे यांनी सांगितले. राज्यात काही कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ब्रेन स्टोन आढळून येत असल्याच समोर आल आहे. याबाबत निष्कर्षाअंतीच बोलता येईल असंही त्यांनी सांगितलं.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com