चंद्रकांत पाटील महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रबिंदू नव्हेत; संजय राऊतांचे टीकास्त्र

'राष्ट्रवादीसोबत आम्ही महाराष्ट्र आहोत, काँग्रेससोबत सुद्धा आहोत मात्र गोव्यात काँग्रेससोबत जागा वाटप झालं नाही त्यांची काही मजबुरी असेल आमची काही मजबुरी असेल'
चंद्रकांत पाटील महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रबिंदू नव्हेत; संजय राऊतांचे टीकास्त्र
चंद्रकांत पाटील महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रबिंदू नव्हेत; संजय राऊतांचे टीकास्त्रSaam TV

मुंबई : चंद्रकांत पाटील हे काय महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रबिंदू नाहीत, राज्याची चिंता करायला आमचं सरकार आहे आणि देशाची चिंता पंतप्रधानांनी करायला हवी. कारण तिकडे लडाखच्या सिमेवरती शत्रूचा धोका वाढत आहे असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. ते आज पत्रकारांशी बोलत होते.

महाराष्ट्रात सध्या अनेक अडचणी आहेत, त्यामुळे राज्याला कार्यवाहू मुख्यमंत्र्याची गरज असल्याचं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं आहे. त्याच्या या वक्तव्यावरती राऊतांनी प्रतिक्रिया दिली. 'चंद्रकांत पाटील हे काय महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रबिंदू नाहीत, राज्याची चिंता बघायला आमचं सरकार आहे असं म्हणत राऊत यांनी पाटील यांना टोला लगावला.

चंद्रकांत पाटील महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रबिंदू नव्हेत; संजय राऊतांचे टीकास्त्र
ठाकरे सरकार धावलं मदतीला; आसाममध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील 60 ते 70 विद्यार्थ्यांची सुटका

राऊत पुढं म्हणाले, 'राष्ट्रवादीसोबत आम्ही महाराष्ट्र आहोत, काँग्रेससोबत सुद्धा आहोत मात्र गोव्यात काँग्रेससोबत (Congress) जागा वाटप झालं नाही त्यांची काही मजबुरी असेल आमची काही मजबुरी असेल उमेदवारांची यादी तयार होतं आहे. आम्ही निवडणुका लढवू 18, 19 तारखेला आम्ही पुन्हा एकदा चाललोय तेव्हा उमेदवारांची यादी जाहीर करू अशी माहिती देखील राऊत (Sanjay Raut) यांनी दिली.

दरम्यान गोव्यातील (Goa) सामान्य लोकांना आम्ही प्रस्थापितांच्या विरोधात उभं करु, गोव्याचे राजकारण हे प्रस्थापितांच्या हाती गेलेले आहे. यामध्ये लॅंड माफिया, भ्रष्टाचारी ड्रग्ज माफिया यांच्या हातात राजकारणाची सूत्रे आहेत. हे जर गोव्यात बदलायचे असेल तर आपल्यातल्या सर्वसामान्यांना गोव्यातील लोकांना निवडून आणायला हवं असंही ते यावेळी म्हणाले.

हे देखील पहा -

यावेळी राऊतांनी उत्तरप्रदेशच्या (UP) राजकारणावरती देखील भाष्य केलं, योगी जर गोरखपूरहुन निवडणूक लढवत असतील तर त्याबद्दल आम्हाला काही आपत्ती नाही. जागावाटपाबाबत उत्तर प्रदेशमध्ये आमचा विचार सुरूआहे. आम्ही पन्नासच्या जवळपास जागा लढवू तर गोव्यामध्ये 10 ते 15 च्या दरम्यान शिवसेना जागा लढवणार असल्याचंही राऊतांनी सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com