सांगली: कृषी कायदा आणि कामगार विरोधी धोरण असणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात आज सांगलीच्या वसंतदादा पाटील साखर कारखानामध्ये कामगारांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत नरेंद्र मोदी चले जाओ अश्या घोषणा कामगारांनी दिल्या. (Sugar workers took part in Bharat Bandh and shouted slogans against the Central Government)
हे देखील पहा -
देशातील आणि पंजाब राज्यातील शेतकरी केंद्र सरकारने दडपशाहीने लागू करू पहात असलेले तीन शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावेत आणि शेतीमालाला ५०% नफ्यासह हमीभाव मिळावा म्हणून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. तसेच देशातील प्रमख देशव्यापी केंद्रीय कामगार संघटना राज्यव्यापी फेडरेशन निरनिराळ्या स्वतत्र कामगार सघटना ही शेतकरी विरोधी तीन कायदे मागे घ्यावेत व शेतकर्यांच्या मागण्या मान्य कराव्यात म्हणून सक्रिय झालेल्या आहेत.
या मागण्यांबरोबरच केंद्र सरकारने कामगार विषयक ४४ कामगार कायदे मोडीत काढून मोठ बड्या भांडवलदार व कारखानदारांना अनुकूल कामगार विरोधी धोरण अवलंबणेचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे. त्यामुळे भाजपाप्रणीत केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी आणि त्यांच्या जनविरोधी भूमिकांना विरोध करण्यासाठी संपूर्ण देशभर भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. यालाच पाठिंबा देत आज सांगलीच्या वसंतदादा पाटील साखर कारखानामध्ये कामगारांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
Edited By - Akshay Baisane
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.