Latur : लातूरकरांवर आली दूषित पाणी पिण्याची वेळ; महापालिका ढिम्म ?
Latur News : लातूरकरंना (Latur) काही दिवसांपुर्वी पिवळं पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी होत्या. यानंतर आज लातूर शहरातील स्वामी विवेकानंद चौक बाभळगाव रोड या ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या व्हाॅलमध्ये गटारीचे पाणी जात असल्याचे निदर्शनास आलं आहे. यावर तातडीने उपाययाेजना हाेणे गरजेचे आहे असे मत नागरिकांनी (citizens) व्यक्त केले.
गेल्या काही महिन्यांपूर्वी लातूरकरांना पिवळे पाणी येत असल्याने नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. यात लोकप्रतिनिधींसह प्रशासनाची दमछाक झाली होती. लातूर शहरातील स्वामी विवेकानंद चौक बाभळगाव रोड या ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या व्हाॅलमध्ये गटारीचे पाणी जात आहे. गेले तीन चार महिने होत आले लातूर शहर महानगरपालिकेचा कारभार आयुक्त पाहत आहेत. यावर महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी काहीही कार्यवाही करत नसल्याने लातूरकरांना गटारीचे पाणी पिण्याची वेळ आलीय.
लातूर शहरातील नागरीकांच्या समस्येच निराकरण होत नसल्याचे चित्र दिसुन येत आहे. याच दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक ठरू शकताे यावर तातडीने कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.