सांगली : एक रकमी एफआरपी (FRP) मिळावी, तसेच वजनातील काटा मारी थांबावी आणि टोळीला द्यावे लागणारे पैसे देण्याची पद्धत बंद व्हावी आदी मागण्यांसह अन्य मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगलीच्या वाळवा आणि पलूस तालुक्यात मोटरसायकल रॅली काढण्यात आली. यावेळी गांधीगिरी मार्गाने तोड घेवू नका असे आवाहन करून शेतकऱ्यांना गुलाबाचे फुल देण्यात आले.
हे देखील पहा :
रॅली चे नेतृत्व स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केले. तसेच एक रकमी एफआरपी न दिल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशारा यावेळी खराडे यांनी दिला आहे. रॅलीला प्रारंभ आष्टा येथील बस स्टँड चौकातून झाला. "एक रकमी एफआरपी मिळालीच पाहिजे, कोण म्हणतोय देत नाय घेतल्याशिवाय राहत नाही, घामाचे चे दाम मिळालेच पाहिजे" अशा घोषणांनी परिसर दणाणून निघाला होता.
हि रॅली आष्टा मार्गे दुधगाव, सर्वोदय कारखाना, बावची, बागणी पद्वालफाटा , पडवळवाडी , हुतात्मा कारखाना, वाळवा, नागराळे, नागठाणे, किर्लोस्करवाडी, क्रांती कारखाना, कुंडल, दह्यारी, तुपारी, ताकारी, कराड रस्ता, बहे मार्गे विश्वास कारखाना चिखली येथे रॅली ची सांगता झाली.
Edited By : Krushnarav Sathe
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.