Pandharpur : एककीडे शेतीला (farm) मुबलक पाणी (water) दिले जात नाही. तर दूसरीकडे थकीत वीज बिलासाठी वसुलीसाठी महावितरण (mahavitran) शेतक-यांकडे (farmers) तगादा लावते. त्यामुळे संतापलेल्या शेतक-यांनी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (swabhimani shetkari sanghatana) समवेत साेनके रस्त्यावर रास्ता राेकाे आंदाेलन छेडले.
शेतक-यांनी पंढरपूर - कराड मार्गावरील (pandharpur karad road) सोनके येथे रास्ता रोको आंदोलन केल्याने या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली. आंदाेलनकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला. त्यामुळेन वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या हाेत्या.
शेती पंपाचा वीज पुरवठा खंडीत करू नये या प्रमुख मागणीसाठी हे आंदाेलन छेडल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सांगितले. तसेच वीज वितरण कंपनीने थकीत वीज बिल वसुलीसाठी तगादा लावला आहे. अनेक ठिकाणी शेती पंपाचा वीज खंडीत केला आहे. यामुळे शेतीला पाणी मिळू शकत नाही.
परिणामी शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहे. त्यामुळे आज शेतकरी आक्रमक झाले. त्यांनी साेनके स्त्यावर उतरून आंदाेलन छेडले असेही शेतकरी संघटनेच्यावतीने सांगण्यात आले. (Maharashtra News)
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.