अमरावती : अमरावती बंदला शनिवारी मोठ्या प्रमाणात हिंसक वळण amravati लागल्याने शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच कोणत्याही प्रकारची अफवा पसरू नये, यासाठी अमरावतीत ३ दिवस इंटरनेट सेवा बंदच ठेवण्यात आली आहे. सध्या अमरावती शहरामधील परिस्थिती नियंत्रणात असून शहरात शांतता पसरली आहे.
हे देखील पहा-
त्रिपुरा या ठिकाणी घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी अमरावतीमध्ये आंदोलन करण्यात आले आहे. त्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी शनिवारी बंद पुकारला होता. यावेळी हिंसाचार मोठ्या प्रमाणात उफाळून आला आहे. यावेळी राजकमल नगर, नमुना गल्ली, अंबापेठ भागात दुकाने आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. काही पानटपऱ्या देखील फोडण्यात आले आहेत. तसेच ५ ते ६ दुकानांना आग लावण्यात आली आहे.
यामुळे जमावाला पांगविण्याकरिता पोलिसांनी बळाचा वापर केला होता. अमरावती बंदला हिंसक वळण लागल्यामुळे पोलिस आयुक्तांनी संचारबंदीचे आदेश काढले आहेत. तसेच हा हिंसाचार घडवून आणणाऱ्या लोकांना सोडणार नाही, असे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले आहे. सध्या अमरावती शहरामध्ये शांतता पसरली असून, नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये, असे आवाहन पोलिसांनी यावेळी केले आहे. दरम्यान, आज भाजपकडून परत एकदा बंदची हाक देण्यात आली आहे.
Edited By- Digambar Jadhav
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.