गोदिंया : अर्जुनी तालुक्यातील नैनापुर गावाजवळ (Nainapur Village) भीषण अपघात झाला असून एकाच कुटुंबातील (Three person death) तीन जणांचा मृत्यू झाला आहे.आई-वडिलांसोबत दोन मुलं देवरी -नागपूर राष्ट्रीय महामार्ग सहावरून प्रवास करीत होते. त्यावेळी नैनापूर गावाजवळ रस्त्यावरून भरधाव वेगानं येणाऱ्या (truck-bike accident) ट्रकची दुचाकीला धडक लागली.दरम्यान, या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चिन्मय तुळशीराम मेश्राम (6), प्रीती तुळशीराम मेश्राम (34) आणि एका बारा वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.तुळशीराम रामा मेश्राम (45) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तुळशीराम मेश्राम हे आपल्या कुटुंबासह लाखांदूर तालुक्यातील धरतोडा येथून देवरीकडे जात होते. नैनापुर गावाजवळ भरधाव वेगानं येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या एका कुटुंबातील दोन मुलांसह आईचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर ट्रक चालक वाहनासह फरार झाला आहे.दरम्यान, दुग्गीपार पोलीस चालकाचा शोध घेत आहेत. तुळशीराम मेश्राम हे देवरी तालुक्यातील देऊळगाव येथे शिक्षक पदावर कार्यरत आहेत.
Edited By - Naresh Shende
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.