सागर निकवाडे, नंदुरबार
Nandurbar News: नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यामध्ये चाऱ्याने खचाखच भरलेल्या ट्रकला भीषण आग (Truck Fire) लागल्याची घटना समोर आली आहे. नवापूर तालुक्यातील खोकरवाडा गावामध्ये ही घटना घडली आहे. अचानक लागलेल्या या आगीमध्ये चाऱ्यासह ट्रक जळून खाक झाला आहे. सुदैवाने या घटनेमध्ये जीवितहानी झाली नाही. पण या आगीमध्ये शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्यातल्या खोकरवाडा या गावात राहणाऱ्या शेतकऱ्याने जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याची साठवणूक करुन ठेवली होती. हा चारा विकण्यासाठी त्याने शेतामध्ये ट्रक बोलावून घेतला होता. ट्रकमध्ये चारा भरुन झाल्यानंतर तो शेतातून रस्त्याच्या दिशेला घेऊन जात असताना चाऱ्याला विजेच्या तारांचा स्पर्श झाला आणि अचानक आग लागली.
आग लागल्याचे कळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत चारा जळून खाक झाला होता आणि ट्रकचे मोठे नुकसान झाले होते. या आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण संबंधित शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले.
दरम्यान, राज्यात यावर्षी अवकाळी पावसामुळे चाऱ्याचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता नंदूरबारमधील शेतकरी जनावरांसाठी चाऱ्याची साठवणूक करुन ठेवत आहेत. अशामध्ये अचानक लागलेल्या आगीमुळे या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
अवकाळी पावसामुळे हा शेतकरी आधीच संकटात सापडला होता. अशामध्ये ज्या चाऱ्यातून पैसा मिळणार होता तोच जळून खाक झाल्यामुळे या शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले. अचानक आलेल्या या संकटामुळे हा शेतकरी चिंतेत आला आहे.
Edited By - Priya Vijay More
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.