
नागपूर : 'व्यक्ती जीवन किती जगला, यापेक्षा कसा जगला हे महत्वाचं आहे. माणसाच्या कर्तृत्वाचा निवडून येण्याशी काही संबंध नाही. वेगवेगळ्या प्रकारचे लोक निवडून येतात. राजकारणात केव्हा काय होईल हे सांगता येत नाही. आताचं राजकारण हे १०० टक्के सत्ताकारण आहे, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केले. (Nitin Gadkari News In Marathi )
सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी यांचा अमृत महोत्सव कार्यक्रम नागपुरात (Nagpur) आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थित होती. या कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. गडकरी म्हणाले, 'गिरीश गांधी यांनी सर्व क्षेत्रात चांगलं काम केलं आहे. आताचं राजकारण हे १०० टक्के सत्ताकारण आहे. राजकारणात गुणात्मक परिवर्तन एक प्रक्रिया आहे थोर पुरुषांपासून काही प्रेरणा मिळत असते. आपली संस्कृती आहे, सगळ्या विश्वाचं कल्याण व्हावं, माझं कल्याण व्हावं असं लिहिलं नाही'.
'राजकारणापेक्षा बऱ्याच गोष्टी अशा आहेत की, ज्या करण्यासारख्या आहे. ज्यामध्ये गिरीश गांधी यांनी पर्यावरण चांगलं काम केलं. व्यक्ती जीवन किती जगला, यापेक्षा कसा जगला हे महत्वाचं आहे. माणसाच्या कर्तृत्वाचा निवडून येण्याशी काही संबंध नाही. वेगवेगळ्या प्रकारचे लोक निवडून येतात. राजकारणात केव्हा काय होईल हे सांगता येत नाही. गिरीश गांधी यांनी राजकीय पक्षाचं काम करताना सामाजिक दृष्टी सोडली नाही', असे ते म्हणाले.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.