
Unseasonal Rain : ऐन थंडीत पडणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. औरंगाबाद आणि जालन्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
मराठवाड्यातील जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने तडाखा दिला. अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे उन्हाळी ज्वारी, मका, गहू आडवा झाला तर रबीतील हरभरासह इतर पिकांचं नुकसान झालंय.
औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रात्री पावसाने हजेरी लावली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात काही ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस झाला. पावसासोबत जोरदार वाऱ्यामुळे रब्बीच्या शेती पिकांचे आणि फळपिकांचे नुकसान झाले. आजही ढगाळ वातावरण असल्यानं पावसाची शक्यता वर्तविली जातेय. औरंगाबाद, बीडमध्ये पावसाची शक्यता आहे. दरवर्षी रबी पिकांना अवकाळीचा फटका बसत असल्यानं शेतकरी हताश झाला आहे. (Latest Marathi News)
जालन्यातही अनेक भागात दहा ते पंधरा मिनिटं विजेच्या कडकडाटसह पावसानं हजेरी लावली.जिल्ह्यातील बदनापूर, भोकरदन,अंबड तालुक्यात अनेक भागात हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस झालाय. त्यामुळे गहू अनेक ठिकाणी आडवा पडला आहे. तर फुलोरा असलेल्या हरभरा पिकाची ही फुल गळती झालीय. वेचणीस आलेला कापूस भिजल्यानं कापसाचं काही प्रमाणात नुकसान झालं आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.