Untimely Rain In Maharashtra : राज्यात आज, मंगळवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात अनेक ठिकणी रिमझिम तर काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस एक तास पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची एकच तारंबळ उडाली. अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. (Latest Marathi News)
बीड जिल्ह्यासह राज्यातील अनेक ठिकाणी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दोन दिवसांपासून हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण आहे. दरम्यान आज, मंगळवारी बीड, अमरावती, परभणी, वर्धा जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली.
अवकाळी पावसाने राज्यातील काही भागात वातावरणात अधिक गारवा निर्माण झाला आहे. अवकाळी पावसामुळे राज्यात खरीब हंगामासह रब्बीतील पिकांना देखील अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले आहे.
परभणीत देखील अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पावसामुळे खरीपातील काढणीस आलेल्या कापूस पिकांचे नुकसान होणार आहे. अवकाळी पावसामुळे कापूस पिकासह भाजीपाला वर्गातील पिकांचं देखील काही प्रमाणात नुकसान झालं आहे. पावसादरम्यान, अनेक ठिकाणी वीज पुरवठा देखील खंडीत झाला होता. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसामुळं कपाशी, भाजीपाला वर्गीय पिकांचं काही प्रमाणात नुकसान झालं. पावसादरम्यान वीज पुरवठा खंडीत झाला होता. जिल्ह्याच्या सर्वच भागात ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.