संतोष जोशी
नांदेड : राज्यात एकनाथ शिंदे गटाने बंडाचं निशाण फडकावून भाजपच्या मदतीने सत्तांतर केलं. त्यानंतर स्थापन झालेल्या नवनिर्वाचीत शिंदे-फडणवीस सरकारवर (Uddhav Thackeray) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांची नियुक्ती करण्यात आलीय. त्यानंतर दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा खरपूस समाचार घ्यायला सुरुवात केलीय. नांदेडच्या पत्रकार परिषदेत दानवे यांनी शिंदे यांच्यावर सडकून टीका केलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांना, खासदारांना खूष करण्याचं काम करत आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत काहीही घेणं देणं नाही, असं म्हणत दानवे (Ambadas Danve) यांनी शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
यावेळी अंबादास दानवे माध्यमांशी बोलताना म्हणाले, बंडखोर,गद्दार आमदार आणि खासदारांना खूष करण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करीत आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी काही देणंघेणं नाही. शिंदे यांनी शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. पंरतु, शिंदे त्या ठिकाणी आले नाहीत.
नांदेड, हिंगोली,परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची गरज होती, मात्र शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना मदत केली नाही. आगामी होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवू आणि त्यांना मदत मिळवून देऊ, असंही अश्वासन दानवे यांनी शेतकऱ्यांना दिलं आहे.
Edited By - Naresh Shende
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.