बीड : बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं आहे. शेतात होत्याचं नव्हतं झालंय. मात्र, या मायबाप सरकारला अद्याप जाग आली नाही. शेतकऱ्यांना केवळ मदत जाहीर केली आहे, प्रत्यक्षात मदत अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही.
हे देखील पहा :
त्यामुळे येणाऱ्या दोन दिवसांमध्ये या शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, तर शिवसंग्राम रस्त्यावर उतरेल. असा इशारा आमदार विनायक मेटे यांनी दिला आहे. जिल्ह्यात जवळपास सहा लाख हेक्टरवर शेतकऱ्यांचे नुकसान झालंय. सरकारने तुटपुंजी मदत जाहीर केलीय, मात्र ती देखील शेतकऱ्यांपर्यंत पोहचली नाही.
त्यामुळे दसरा सण तर गेलाय, मात्र येणारी दिवाळी कशी करावी ? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. यामुळे येणाऱ्या दोन दिवसांमध्ये शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मदत पोहोचली नाही. तर शिवसंग्राम मोठं आंदोलन करत, मोर्चा काढेल. असा इशारा शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिला आहे. ते बीडमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.
Edited By : Krushnarav Sathe
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.