Tushar Gandhi : महात्मा गांधींना मारण्यासाठी सावरकरांनी गोडसेंना बंदूक पुरवली; तुषार गांधींचं खळबळजनक ट्विट

एकीकडे राहुल गांधी यांच्यावर टीकेचा भडीमार होत असताना आता दुसरीकडे या वादात महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी सुद्धा उडी घेतली आहे.
Tushar Gandhi on Vinayak Savarkar
Tushar Gandhi on Vinayak Savarkar Saam TV

Tushar Gandhi on Vinayak Savarkar : राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सावरकरांच्या मुद्द्यावरून मनसे आणि भाजप चांगलेच आक्रमक झाले आहेत. एकीकडे राहुल गांधी यांच्यावर टीकेचा भडीमार होत असताना आता दुसरीकडे या वादात महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी सुद्धा उडी घेतली आहे.  (Latest Marathi News)

Tushar Gandhi on Vinayak Savarkar
Shinde vs Thackeray : शिंदे गट आदित्य ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत

महात्मा गांधींना मारण्यासाठी नथ्थुराम गोडसे यांना सावरकरांनी बंदूक पुरवली होती, असं खळबळजनक ट्विट तुषार गांधी यांनी केलं आहे. इतकंच नाही तर, 'सावकरकर यांनी केवळ इंग्रजांनाच मदत केली नाही, तर बापूंना मारण्यासाठी नथ्थुराम गोडसेला चांगली बंदूक मिळवून देण्यासाठी सु्द्धा मदत केली. बापूंच्या हत्येच्या दोन दिवस आधीपर्यंत नथ्थुराम गोडसेकडे कुठलंही शस्त्र नव्हतं', असा आरोप महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान सावरकरांविषयी बोलताना विधान केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर भाजपसह मनसे नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यानंतर सावकरांचे नातू रणजित सावरकर यांनी देशाचे दिवंगत पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यावर गंभीर आरोप केला होता.  (Maharashtra News)

पंडित नेहरू यांनी एका बाईसाठी देशाची फाळणी मान्य केली, असं वादग्रस्त विधान केलं होतं. इतकंच नाही तर, पंडित नेहरू हे १२ वर्षे भारताची गुप्त माहिती ब्रिटीश सरकारला देत होते, असा आरोपही त्यांनी केला होता. एका पत्रकार परिषदेत रणजित सावकर यांनी हा आरोप केला होता.

'माझी भारत सरकारला विनंती आहे की नेहरू आणि एलविना पत्र व्यवहार ब्रिटीशांना मागावा आणि तो जनतेत जाहीर करावा, तेव्हा जनतेला कळेल ज्याला आपण चाचा नेहरू म्हणतो त्या नेत्याने देशाची कशी फाळणी केली ते समजेल", असंही रणजित सावकर यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या आरोपामुळे वादाची मालिका सुरू झाली.

दरम्यान, आता या वादात महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी सुद्धा उडी घेतली आहे. 'सावरकरांनी केवळ इंग्रजांनाच मदत केली नाही, तर बापूंच्या हत्येसाठी नथुराम गोडसेला बंदूक मिळवून देण्यासाठी सु्द्धा मदत केली. बापूंच्या हत्येच्या दोन दिवस आधीपर्यंत नथ्थुराम गोडसेकडे कुठलंही शस्त्र नव्हतं', असं ट्विट तुषार गांधी यांनी केलं आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com